Saturday, 14 February 2015

ON VALENTINE DAY....


१.पापा कहते है "बेटा पढाई करके कुछ बनो" तो बुरा लगता है, पर यही बात जब गर्लफ्रेंड कहती है तो लगताहै केयर करती है 

 २. गर्लफ्रेंड के लिए माँ-बाप से झूठ बोलते है, पर माँ-बाप के लिए गर्लफ्रेंड से क्यूँ नहीं ?

३. गर्लफ्रेंड से शादी के लिए माँ-पापा को छोड़ देते है, पर माँ-पापा के लिए गर्लफ्रेंड को क्यूँ नहीं ?


4. गर्लफ्रेंड से रोज रात में मोबाईल से पूछते है खाना खाया की नहीं या कितनीरोटी खाई, पर क्या आज तक ये बात माँ-पापा से पूछी ?


5.गर्लफ्रेंड की एक कसम से सिगरेट छूट जाती है, पर पापा के बार-बार कहने से क्यूँ नहीं ?
कृपया अपने माँ-बाप की हर बात माने और उनकी केयर करे...और करते हो तो आपके माँ-बाप आपके लिए कुछ भी गर्व से करने को तैय्यार है


और ये सबको बताये और समझाए, क्या पता आपकी बात उसके समझमें आ जाये...?
अपने को माहोल ही ऐसा बनानाहै की हर बच्चा अपने माता-पिता को ही भगवान समझे...........

Tuesday, 10 February 2015

एक सुंदर स्टोरी

तो पुण्यात होता.....
काही कामानिमित्त
गेला होता..
त्या दिवशी तिने
news मध्ये ऐकला कि स्वारगेट
जवळ एका bus driver ने
...
गाडीखाली लोकांना चिरडले..
तिने
लगेच त्याला call केला,
ती :"हेल्लो, कुठे आहेस तू??"
तो :"आणखी कुठे असणार
आहे??
मी काही इथे पिकनिक
साठी नाही आलोय."
ती :"अरे मला अस म्हणायचं
होता कि..."
तो :"हे बघ, मला काम आहेत,
आपण मी परत आल्यावर
बोलू,
कळल ना??"
ती :"अरे स्वारगेट
ला accident झालाय बस
मुळे.. म्हणून
मी..."
तो : (चिडून)"त्यात काय
ऐवढ,
रोजच होतात,
तुम्हा बायकांना ना विनाकारण
काळजी करण्याची सवय
असते..
आता म्हणशील
कि रस्ता नीट बघून क्रॉस
करत जा, गाडी हळू
चालव, अस तसं.... ठेव फोन
आता,
मला वेळ नाही आहे..
आणि प्लीज
मला call करू नको,
मी तुला बोलतो रात्री,
बाय"
अस म्हणून त्याने फोन ठेवून
दिला..
संध्याकाळी,
घरी येताना तो फोन वर
बोलत
बोलत रोड क्रॉस करत
होता,
तेवढ्यात समोरून एक
गाडी त्याच्या अगदी जवळ
येऊन थांबली..
त्याला काहीही लागलं
नाही...
पण त्याची छाती धडधडू
लागली.. त्याने कोपऱ्यावर
जाऊन आधी तिला फोन
केला,
म्हणाला,
"तू म्हणालीस ते बरोबर आहे,
मी कधीच
नीट बघून
रस्ता क्रॉस करत नाही..
आज
माझं काही खरच नव्हतं... तू
आहेस
म्हणून माझी गाडी रुळावर
आहे,
मी तुझ्या अंगावर ऐवढ
ओरडलो... तरी तू शांतपणे ऐकून
का घेतलास??"
ती म्हणाली,"काय करणार,
प्रेम केलंय ना...

Proud to being single


Feb 7 :: रोझ ङे ----
20 रुपये खर्च(लाल गुलाब)
.
Feb 8 :: प्रपोझ ङे ----
100 रुपये खर्च ( ग्रीटिँग )
.
Feb 9 :: चॉकलेट ङे ----
250 रुपये खर्च
( स्वस्त चॉकलेट द्यायला जमत नाहि)
.
Feb 10 :: टेङि ङे ----
700 रुपये खर्च (हि तर स्टार्टिँग किंमत आहे)
.
Feb 11 :: प्रॉमिस ङे ----
130 रुपये खर्च ( परत काहितरी जेवण/आईस्क्रीम)
.
Feb 12 :: हग ङे ----
250 रुपये खर्च
( झप्पी मारायला परफ्युम तर चांगला लागेलच ना ? )
.
Feb 13 :: किस ङे ----
150 रुपये खर्च
(SPRAY MINT, पप्पी घ्यायच्या आधी) .
.
Feb 14 :: व्हँलेन्टाईङ ङे ----
2000 रुपये खर्च
( एवढा खर्च तर लागतोच नाहितर पोरगी नाराज, movie+hotel+drive)
.
.
.
.
अभिनंदन सिँगल असणाऱ्यांनो,,,
या आठवङ्यात तुमचे जवळपास 3600 रुपये खर्च होण्यापासुन वाचलेत..
.
.
Benefits of being single...

दोन मनाच नात.....

तिच्या आठवणी च काहुर
सकाळ पासून लागल होत।
तिला जाउन हुड्काव, असच
माझ मन मला सांगत होत।
तोच विचार मला आज
तिच्याकडे नेणार होता।
ते हरवलेल फूल माझ
मला परत देणार होता।
कुणास ठाव कशी
माझी ही हिम्मत झाली।
आणी हसतच पावले
तिच्या घरी निघाली।
रात्रीच भान नव्हत
काळ जी ही नव्हती कसली।
आज माझ्या कनाकनात
तीच होती बसली।
हुड्कत होतो तिला
सार्या गावात विचारून।
जणू तिलाही लागावी चाहुल
आन तीनच याव समोरून।
काय होत हे
माझ मलाच नव्हत कळल।
पण दोन मनाच नात
तिथ पुन्हा होत जुळल।
पण दोन मनाच नात
तिथ पुन्हा होत जुळल।

Monday, 9 February 2015

मी न लिहिलेली कविता..

तुला पाहिल की रोज एक विचार यायचा
तुझ्या सौंदर्याला, स्वभावाला कवितेत गुंफायचा,
चांदण्यांच्या चादरीखाली मग तुला आठवत बसायचो
तुला शब्दांत बांधन्यासाठी शब्दानशीच भांडायचो
सरते शेवटी शेवटी रात्रच निघून जायची
पण तुझ्या सौंदर्याला गाथाच नाही फुटायची
हट्ट करून करून शेवटी लेखणीच थांबून जायची
पण तुझ्या निरागस्तेला शब्दांत न गुंतवायची...
ती ओठांची चल बिचल,
त्या तू केलेल्या खोड्या,
शेवटी मीच थकून जायचो
स्वतलाच हसत हसत म्हणायचो...
नाही... हे तुझ्याने जमणारच नाही
तुला शब्दांत बांधन्यासाठी शब्द्च कोणता नाही
आज पर्यंत ती कविता तशीच अधुरी आहे
मी न लिहिलेली कविता मात्र
माझ्या डोळ्यांत तू पाहिली आहे....

(एक प्रेमकथा)

शारदा किती उशीर कितीवेळ तुझी वाट पाहायची.रात्रीच े साडेअकरा वाजुन गेले की गं...अरे हो रे,आज थोडा उशीरच झाला.पण तुझ्यासाठी काही आणलंय मी?
काय?
उकडीचे मोदक तुला खुप आवडतात ना??
हो खुपच आवडतात.रवी डब्यातला एक मोदक खातो.आणि तिच्याकडे बघुन विचारात पडतो..तिला विचारतो,शारदातु ला भिती नाही का गं वाटत?गेली सहा महीने रोज रात्री आपण या झाडाखाली भेटतो.तु माझ्यासाठी कायम काही ना काही घेऊन येतेस.
कशाची भीती?
भुताखेतांची?
बावळटच आहेस भुत वगैरे काही नसतं रे..
आणि एकदिवस खरंच भुताने वाटेत तुला आडवलं तर?
तर ते भुत तुच असशील!
चेष्टा पुरे हं आता!
ok sorry,sorry तु असलास की मला कसलीही भीती वाटत नाही रवी!
असं,मग मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे सांग ना मला?
पुन्हा कधीतरी सांगेन,आत्ता उशीरहोतोय मला जायला हवं.
अगं पण जाताना ते एकदा म्हणुन जा ना जे ऐकायसाठी मी इथे आलोय!
तुच म्हण ना मग.
i love u sharada.
mi 2...
.12 HOURS AFTER....
शारदाला वाचनाची खुपच आवड आहे.पण कामाच्या ओघामुळे तिला गेले कित्येक दिवस वेळच मिळालानाही वाचनासाठी.पण आज तिला वेळ मिळालाय.म्हणुन ती स्वातंत्रपुर्व काळापासुन असलेल्या एका ग्रंथालयात गेलीय.तिथल्या धुळखात पडलेल्या बर्याच पुस्तकांच्या कपाटामध्येती सत्यकथांवर आधारीतअसलेली पुस्तके शोधतीये...त्याम ध्ये तिलाएक पुस्तक मिळतं जे पंचवीस वर्षापुर्वी घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक आहे.जेव्हा ती ते पुस्तक उघडते तेव्हा तीच्या पायाखालची जमिनच सरकते.तिच्या तोंडचं पाणी पळतं.अंगाचा थरकाप होतो.ती त्या पुस्तकातली काहीच पाने उलगडतीये.त्यानं तर ते पुस्तक घेउन या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथपालांसमोरव ्यक्त करते.त्यांच्याक डे ऊपलब्ध माहीतीद्वारे ते शारदाला त्या लेखकाचा योग्य पत्ता देतात.तो लेखक इथुन फक्त दोन तासाच्या अंतरावर असतो.शारदा लवकरच त्यांच्या घरी पोहोचते.एक पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध दरवाजा उघडतात.दारात उभ्या असलेल्या शारदाला पाहुन ते खुपच घाबरतात.त्यांना जब्बर मानसिक धक्का बसतो.त्यांची ही अवस्था पाहुन शारदाला वाटतंकी ते आपल्याला आधीपासुनच ओळखतात आणि तिला खुपच घाबरताहेत।हे पाहुन शारदा त्यांना आपली व्यवस्थित ओळख करुन देते.तेव्हा कुठे जाऊन त्यांची परिस्थिती स्थिर होते.तेच त्यापुस्तकाचे लेखक होते.त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातील या सत्यघटनेविषयी शारदा त्यांनाविचारते. ते सांगु लागतात;पंचवीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.जेव्हा मी पार्किन्सन कंपनीतल्या रिसर्च कमिटीत काम करायचो.एका खेडेगावात आमचा प्लांट लागणार होता म्हणुन आमची कमिटी तिथलं निरीक्षण करायला गेली होती.पण त्या दिवशी तिथले गावकरी एका युवकाला जबर मारहाण करत आणत होते.एक मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती.त्याला मारु नका,त्याला मारु नका।असं म्हणत होती पण कोणीही ऐकलं नाही आणि सर्वाँसमोर त्याला एका झाडावर लटकवण्यात आलं आणि त्यातच त्याचामृत्यु झाला..
पण हे कसं शक्य आहे या पुस्तकात जो फोटो दिलाय तो तर माझ्या प्रियकराचा आहे त्याला तर मी रोज भेटते आणि आम्ही दोघं एकमेकांवर खुप प्रेम करतो.मी तर या पुस्तकातला याचा फोटो बघुनच तुमच्याकडे आलेय..
पोरी ही निसर्गाची किमया म्हण किँवा आणखी काही पण हा तोच मुलगा आहे,ज्याच्यावर तु प्रेम करतेस.
पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगु शकता.?त्यांनी एका जुन्या कपाटातुन फोटो काढला आणि तिला दाखवला तो फोटो तिचाच होता..हीआहेती मुलगी जी त्या मुलावर प्रेम करायची आणि जिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला।तो फोटो शारदाचाच होता.म्हणुनच तर मी तुला पहील्यांदा दाराशी पाहीलं तेव्हा घाबरलो होतो.
मन सुन्न झालेल्या अवस्थेत शारदातिथुन निघाली.मनात असंख्य प्रश्ननिर्माण झाले होते.रवी मेलेला आहे ही गोष्ट गृहीत धरुन चालल्यास घडलेल्या बाकी सर्व गोष्टीँचा योग्य तो मेळ बसत होता.शारदाला ही गोष्ट पुर्णपणे पटली की,रवी जिवंत नाहीये.
रात्र झाली शारदा पुन्हा रवीला भेटण्यासाठी त्याच झाडाजवळ आली होती.
आज पुन्हा उशीर,अगं कितीवेळा तु उशीर करतेस?आणि हे डाव्या हातालाकापड कसलं बांधलयस?
रवी मला तुला काही विचारायचंय?मला खरं खरं सांगशील?
हो,विचार नक्की खरंखरं सांगेन
तुझा जन्म केव्हाचा आहे?
रवीःशेवटी तुला सगळं कळलंय तर..अगं मग मला असंतिरक्याने का विचारतेयस.सरळ विचार ना.होय मी एक आत्मा आहे.मी तुला सगळं खरं खरं सांगतो!
त्याची गरज नाहीये.मला सगळं ठाऊक आहे.मला फक्त एवढंच सांग तु मला तुझ्याबरोबर नेणार आहेस की नाही?मी फक्त तु जिथे जाशील तिथेच जायचंय?सांग मला सोबत नेशील ना?
शारदा काय बोलतेयस तु?मी तुझा जीव नाही घेउ शकत.तुला कळत कसं नाही.असं काय करतेस तु?
जे काय करायचं ते तासाभरापुर्वी केलंय मी...
.काय?काय केलंयस तु?
शारदाने आपल्या डाव्या हाताला बांधलेलं कापड काढलं.आणि त्याला दाखवलं.तिच्या हाताची नस कापलेलीहोती.अगं हे काय केलंस?याने तुझा जीव जाईल.चल..
थांब रवी माझा जीव मी आधीच दिलाय तासाभरापुर्वीच. मी ही आत्ता जीवंत नाही.माझंशरीर मी मागे ठेवुन आलेय.आत्ता तरी मी तुझी होईल ना.आता तरी मला तुझ्यासोबत नेशील ना?
रवीने शारदाला एक घट्ट मिठी मारली.त्या मिठीतला ओलावा दोघेहीअनुभवत होते.दोघांच्याह ी डोळ्यात अश्रु भरुन वाहत होते.पण ते जमिनीवरही पडत नव्हते,हवेतच विरुनजायचे.जसं काही त्यांचं अस्तित्वच संपलंय.शारदा आणि रवीसारखं...

Sunday, 8 February 2015

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा....

Saturday, 7 February 2015

टाईम पास २ कथा - Timepass 2 Story


माधवराव लेले भटाची चाळ सोडुनपुण्याला राहायला जातात.तिथेच स्थायिकहोतात.प्राजक्ता तिथल्याच एका कॉलेज मध्ये प्रवेश घेते.पण ती अजून दगडुला विसरलेली नसते.दगडु बरोबर घालवलेले सोनेरी क्षण तिच्या मनात आठवण बनुन राहीलेले असतात.ती परत कोणाच्या प्रेमाचा विचार करू शकत नाही त्या दरम्यान वल्लभ माधवरावांच्या मर्जी विरूध्द स्पृहा शी लग्न करतो. त्या मुळे माधवराव नाराज होतात.ते वल्लभ ला घराबाहेर काढतात.वल्लभ व स्पृहा वेगळे राहायला जातात.त्यामुळे प्राजक्ता ने जर परत काय
चूक केली तर मी आत्महत्या करेन अशी धमकी माधवराव देतात.३,४ वर्षांचा कालावधी जातो.एक हँडसम, स्मार्ट मुलगा प्राजक्ताच्या कॉलेज मध्ये एंट्री करतो.त्याचे नाव असते रॉकी.त्यावेळेस रॉकी समोर काही मुले एका मुलीची छेड काढत असतात. ती मुलगी दुसरी कोणी नसुन
प्राजक्ता असते.रॉकी त्या मुलांची धुलाई करतो.प्राजक्ता रॉकीचे आभार मानायला लागते.पण रॉकी "ईट्स माय ड्युटी " असं म्हणुन तिथुन निघतो.पुढे रॉकी प्रा.ची.बर्याच संकटात मदत करतो.त्यामुळे ती दोघे चांगले मित्र बनतात.एकदा माधवराव लेलेंच्या गाडी समोर मुलगी आल्याने अपघात होतो. लोक माधवरावांना मारायला लागतात.पण ऐन वेळी रॉकी तिथे येऊन त्यांना मदत करून त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. त्यामुळे रॉकीचे इंप्रेशन माधवरावांवर पडते. पुढे रॉ. प्रा.ला प्रपोज करतो.पण आपली प्राजू रॉकीला नकार देते.ती म्हणते आपण फक्त चांगले मित्र आहोत व दगडु बद्दल त्याला सर्व सांगते. मग रॉकी प्राजुला एक गिफ्ट देऊन निघुनजातो. ती ते उघडून पाहते तर त्या मध्ये मोरपंख व तिचा फोटो असतो ती आनंदात त्याला पळतच जाऊनघट्टमिठी मारते. व म्हणते.आज पर्यंत का लपवुनठेवलेस...तेव्हा रॉ. म्हणतो मला पहायचं होतं की मी तुझ्या मनात अजून कितीसा शिल्लक आहे. प्राजू:-माझे प्रेम टाईम बरोबर पास होणारे नव्हते. दगडुने सायकल चालवुन नंतर बाईक रेसिंग करुन कसे पैसे जमा केले व १२ वी मध्ये ८५ टक्के मार्क़स कसे काढले वगैरे ....वगैरे.. हे सांगताना माधवराव लेले सर्व ऐकत असतात.ते त्याची माफी मागतात. पण रॉकी तुमच्या मुली मुळे काहीतरी करु शकलो. पुढे काय....
दोघांचं लग्न.... व वल्लभ आणि स्पृहा चा स्वीकार....
संपला पिक्चर :)